अध्यात्मरामायणाची पार्श्वभूमी

अध्यात्मरामायणाची पार्श्वभूमी -

अध्यात्मरामायण श्रीशंकरांनी पार्वतीदेवीच्या विनंतीवरून तिला सांगितले होते. ते बरीच युगे गुप्त राहिले होते.

अध्यात्मरामायणाचा मृत्यूलोकात उदय होईपर्यंतची स्थिती -

ब्रह्महत्यादी पापे वाढीस लागली होती. कलीचे माहात्म्य वाढले होते. यमाचे शूर योद्धे निर्भयपणे संचार करीत राहिले होते. जीव नरकात जाण्याचे प्रमाण वाढलेले. सर्व शास्त्रे परस्परांशी वाद घालत राहिली होती. श्रीरामाचे मूळ सत्यस्वरूप बुद्धीमंतांनाही समजण्यास अवघड राहिले होते.

मृत्यूलोकात कलियुगात अध्यात्मरामायणाचा प्रसार झाला. त्यामुळे त्याच्या केवळ अध्ययनाने सद्‌गती मिळण्याची शक्यता वाढली.

॥श्रीराम समर्थ॥