१५ जुलै

तळमळ लागल्यावर गुरूभेट निश्चित!
------------------------------------------
गुरू कसे असतात?

- गुरू सारखा तुमच्याकरीता वाट पाहात असतो. परमेश्वर भेटावा अशी तुम्हाला तळमळ लागली तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तुम्हाला तो शोधायची गरज भासणार नाही -अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील.
- गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार असतो.
- त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका.
- तुम्ही दुश्चित्त झालात की तो दुश्चित्त होतो.
--------------------------------------------
गुरूभेट व्हावी यासाठी काय करावे?

- सद्‌विचार (भगवंताचा विचार) - भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत.
- सत्संगती (संत ओळखणे फार कठीण आहे, आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हा तो कळायचा.)
- नामस्मरण - भगवंताचे सतत नाम घ्यावे.
------------------------------------------
गुरुभेट झाल्यावर शिष्याने काय करावे?

- सदा आनंदात राहावे.
- आपल्याला आता काही करणे उरले नाही असे समजावे. एकदा गुरुभेट झाली की तुम्ही तुमचे उरत नाही.
- गुरुला अनन्यशरण जावे. आणखी काही करण्याची जरूरी नाही.

॥श्रीराम समर्थ॥