सद्‌गुरु

सद्‌गुरुस जावे शरण । संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम ॥
---------------------------------------------------------------
रघुपती कसा आहे? त्याला काय आवडते?

- ज्याचे अंतःकरण शुध्द आहे, ज्याचे आचरण शुध्द आहे, परमात्म्याबद्दल ज्याची वृत्ती शुध्द आहे, त्याच्यापासून दूर रघुपती राहत नाही (त्याच्याजवळ राहतो).
- जेथे नामात प्रेम आहे, तेथे पुरुषोत्तम प्रकटतो.
-----------------------------------------------------
विरक्ती (वैराग्य) आणि विवेक म्हणजे काय? त्यांचे महत्व काय? तो आपल्या अंगी कसा येईल?

आपल्याला सद्‌गुरुचा आधार वाटावा.
---------------------------------------
संत कसे असतात?

- संतांमध्ये अहंकार जिवंत राहत नाही, कारण "परोपकार" करायला लागणारा "पर" च ठिकाणावर नसतो, त्यामुळे "दुसर्‍याकरीता मी काही केले" ही भावना व्हायला आधारच राहत नाही.
- संत कधीकधी आपल्याला विषय देतात हे खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
------------------------
संतसंगती कशी करावी?

- तीर्थयात्रा व साधुसंतांची भेट या निमित्ताने आपल्या अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होते.

जुलै महिन्यातील ३१ प्रवचने "सद्‌गुरु" या विषयावर आहेत. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ती परमभक्त श्री. गोखले यांनी मूळ ग्रंथात घातली आहेत. या वेबपेजेस मध्ये ऋजुता विनोदांनी त्यांच्या साधनाकालात केलेले चिंतनपर लेखन आहे. जिज्ञासूंनी मूळ प्रवचनांचे पुस्तकही वाचावे.

॥श्रीराम समर्थ॥

सद्गुरुचे महत्व
----------------
संदर्भ - चरित्र - पान - ६४८ ते ६५३
------------------
साधकाच्या साधकपणाची सुरुवात स्वतःमधील सततच्या असमाधानाची जाणीव होण्यातून होते

साधन दोन अंगांचे असते. (एकाच वेळी दोन्ही गोष्टी होतात)

Syndicate content