भगवंताचे नाम सोडू नका.
----------------------------
सर्वसामान्य माणूस -
- संकल्पशक्तीचा उपयोग विषयप्राप्तीसाठी करतो. कितीही विषय मिळाले तरी ते अपूर्ण असल्यामुळे माणूस असमाधानी राहतो.
- तो भगवंताचा असूनही भ्रमाने "मी विषयाचा आहे" असे त्याला वाटते.
-------------------------------
पूर्ण समाधान कशाने होते?
- भगवंताच्या प्राप्तीची प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो.
- भगवंत पूर्ण असल्याने, त्याच्या प्राप्तीने भक्ताचे पूर्ण समाधान होते.
- प्रथम भक्ताच्या वासनांची पूर्ण तृप्ती होते, मग त्या क्षीण होतात, नंतर त्या आपोआप नाहीशा होतात.