श्रीगोंदवलेकरमहाराज

या लिंक अंतर्गत
- पत्रे
- प्रवचने
- अभंग
- स्फुट
या द्वारा सर्व मार्गदर्शन वाचायला मिळेल.

॥श्रीराम समर्थ॥

आपण मागावे फक्त एका रामाजवळ.
----------------------------------------
प्रापंचिक सामान्य व सगुणोपासना -

भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणॊपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे.
-------------------------------
रामभक्ताने काय करावे?

- आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी.
- आपले जगणेदेखील त्याच्या सेवेसाठी असावे.
- रामरामा आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकासारखा वाटावा.

साधन-चतुष्टय
-----------------
परमार्थाचा पाया घालण्यासाठी साधनांचा पाया घालावा.

शास्त्राने सांगितलेले साधन -
१) नित्यानित्यवस्तुविवेक करावा
- अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत उदास व्हावे.
- नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे.
२) या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी.
३) आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्षविषाद न मानत संतोषाने राहावे.

भगवंताचे नाम सोडू नका.
----------------------------
सर्वसामान्य माणूस -

- संकल्पशक्तीचा उपयोग विषयप्राप्तीसाठी करतो. कितीही विषय मिळाले तरी ते अपूर्ण असल्यामुळे माणूस असमाधानी राहतो.
- तो भगवंताचा असूनही भ्रमाने "मी विषयाचा आहे" असे त्याला वाटते.
-------------------------------
पूर्ण समाधान कशाने होते?

- भगवंताच्या प्राप्तीची प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो.
- भगवंत पूर्ण असल्याने, त्याच्या प्राप्तीने भक्ताचे पूर्ण समाधान होते.
- प्रथम भक्ताच्या वासनांची पूर्ण तृप्ती होते, मग त्या क्षीण होतात, नंतर त्या आपोआप नाहीशा होतात.

सद्‌गुरुला शरण जावे.
----------------------------
देव कसे असतात?

- गुरू प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरू कसाही असला तरी प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते.
- गुरू सांगेल ते साधन आपण करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते.
- साधक समाधानी-अनन्य असला की देव त्याला उचलून घेतो.
-----------------------
संत कसे असतात?

- गुरू हे देहात कधीच नसतात.
- गुरू फक्त नामाबद्दलच बोलतात.
- जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरूला देखील आपले स्वतःचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
- संत एकच देव, एकच साधन आणि एकच गुरू मानला.

आधी श्रध्दा, मग कृती, नंतर अनुभव.
------------------------------------------
शिष्याने कसे वागावे?

- आपल्याला सद्‌गुरूचा आधार आहे अशी पक्की खात्री बाळगावी.
- आपली निष्ठा भगवंतावर ठेवावी.
- भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तरच मनुष्य त्याचे नाम घेईल.
- भगवंतावर श्रध्दा ठेवून काळजी न करता स्वस्थ रहावे.
- परमार्थात श्रध्देशिवाय चालत नाही.
- श्रध्देनेच शिष्याच्या अंगी पात्रता येईल.
- संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रध्दा ठेवावी. अशी श्रध्दा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. असा माणूस सुखी होतो.
- स्वतःशी प्रामाणिक व्हावं.

गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवतात.
------------------------------------------
सर्वसामान्य साधक कसे असतात?

- ते गुरुजवळ विषय मागतात.
- साधक चांगले शिकले-सवरलेले, वयस्कर तरीही त्यांना विषयांत उडी घ्यावीशी वाटते.
- "गुरुला समजतच नाही" असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते.
- सध्या दिसते तेच सुख असे ते मानीत असतात.
----------------------------------------
गुरू/संत/सत्पुरुष कसे असतात?

वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे.
-----------------------------------------------------
शास्त्रांनुसार (मोक्षासाठी/परमात्मप्राप्तीसाठी) युगाला उचित साधन -

- कृतयुगामध्ये ध्यान हे साधन
- त्रेतायुगामध्ये हवन हे साधन
- द्वापरयुगामध्ये देवतार्चन हे साधन
- कलियुगामध्ये नामस्मरण हे साधन.
---------------------------------------
नामस्मरण हे साधन कोणी कसे सिध्द केले?

- संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि सांगितले की साडेतीन कोटी जपाने चित्तशुध्दी होते आणि १३ कोटी जपाने भगवंताचे दर्शन होते.

नामातच राहे समाधान । ही सद्‌गुरुची आहे खूण ॥
-------------------------------------------------------
साधकाने राम कसा जोडावा?

- रामापायी मन ठेवावे.
- रामापायी भाव ठेवावा.
- रामाला अनन्यशरण जावे.
- रामरूपी चित्त ठेवावे.
- रामाला प्रार्थना करावी," तुमच्या नामामध्ये माझे मन लागावे"
- नामात चित्त असावे.
- नामाशिवाय मन तळमळावे.
- नामाविना साधन करू नये.
- देह कष्टवू नये.
- रामाविना कोणाला सखा करू नये.
- रामसेवा हीच हिताची मानावी.
- मनाने भगवंताचे व्हावे.
- राम सर्व कर्ता आहे हे जाणावे. त्याचा भरवंसा ठेवावा.
- रामरायाचे सन्निध्य राखावे.

गुरुआज्ञापालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरत नाही.
----------------------------------------------------
एकदा गुरु केल्यावर शिष्याने कसे वागावे?

- आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे.
- निर्गुण परमात्मा जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला हवे - म्ह्णून देहबुध्दी सोडावी.
- परमात्मरूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त करावे. आपण पूर्ण निष्पाप झालो तर आपल्याला जगात पाप दिसणार नाही.

Syndicate content