संत "तू भगवंताचा आहेस" ही जाणीव देतात.
------------------------------------------------
नाम कसे घ्यावे?
- आपण नाम कशाकरीता घेतोय त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याला अनुसंधान म्हणतात.
- "मी विषयाचा नाही, मी भगवंताचा आहे" ही जाणीव संतांकडून आपल्याला मिळते. त्याकरीता ते नाम घ्यायला सांगतात.
- ही जाणीव टिकवण्याकरीता, मनाला तेचतेच पुन्हा सांगावे लागते, म्हणून नाम सतत घ्यायचे असते.
- भाव ठेवून नामसाधन करावे, म्हणजे भगवंताची प्राप्ती लवकर होते.